प्रस्तावना
तरुणाई समाजासाठी भारतीय नवतरुण हाच या देशाचा कणा आहे असे स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत याच उद्देशाने यशवंत सामाजिक प्रतिष्ठान नव तरुणांचा समूह घेऊन समाजामध्ये समाजउपयोगी कार्य करण्यात सहभागी झाला असून विवीध सामाजिक उपक्रमातील सहभागामुळे समाजाच्या ऋणातून काही अंशी उतराह होण्याचा प्रयत्न करत आहे.
आपणा सर्वांचे या उपक्रमामध्ये स्वागत व आपलाही सहभाग असावा अशी अपेक्षा.

पाच दशकांपासून विविध क्षेत्रामध्ये कार्य करत असताना एक शिक्षक म्हणून कार्याची सुरुवात केली व आयुष्याकडे मागे वळून पाहत असताना या विधात्याने मला जन्मास का घातले? मी कोण? माझा जन्म कशासाठी? कोणत्या उदात्त हेतूसाठी परमेश्वराने मला जन्मास घातले या सर्व विचारांची घालमेल चालू असतानाच राजकारण, समाजकारण यांची सरमिसळ न करता मिळेल. त्या संधीचं सोनं करण्याचं कार्य माझ्या... अधिक वाचा

कौटुंबिक राजकीय वारसा असतानाही आपण राजकारणाकडे पूर्णतः न झुकता समाजासाठी काही तरी करण्याची उर्मी मला काही शांत बसू देत नव्हती व इतर नेत्यांची, पुढार्यांची मुला वेग-वेगळ्या क्षेत्रात राजकीय काम करत असताना मी मात्र हे समाजकारणाचे क्षेत्र निवडले व त्यावेळची माझी निवड किती सार्थ होती याचा मला आनंद वाटतो. प्रतिष्ठानची स्थापना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करून... अधिक वाचा